माझी आई नेहमी म्हणत असते, "काय हल्लीची मुलं हुशार झाली आहेत, आम्ही ऐकल्या नाहीत आणी पहिल्या नाहीत अश्या गोष्टी काय सहजपणाने वापरतात, आदित्य जो खेळ खेळतो फोनवर तो खेळायचा मी विचार सुद्धा करू शकत नाहीं.”
असं काही ऐकलं कि मला मात्र खूप गोंधळून जायला होतं, कि हल्लीच्या मुलांचं कौतुक करावं कि ते जगत असलेल्या परिस्थितीची कीव करावी? मला तर कधी कधी वाटतं कि आईवडील मुलांना वेळ देण्याच्या कटकटीतुन सुटका करून घेण्यासाठी त्यांना हि सगळी खेळणी देत असावेत किंवा मुलाच्या मित्रा कडे आहे, म्हणजे त्याच्या कडे असलेच पाहिजे, ह्या भावनेतून देत असावेत, ह्याला पियर प्रेशर असं म्हणतात.
पूर्वी आम्ही लहान असताना आम्हाला टी. व्ही. पाहण्याचं वेड होतं. अचानक घरी कोणी पाहुणे आले कि मोठी माणसं ओरडायची आम्हाला. "तो टी. व्ही बंद करा आधी… जरा बोलुदे शांतपणे आम्हाला…" तेंव्हा राग यायचा पण आता वाटतं किती बरोबर होता त्यांचं. जिवंत माणसाशी बोलणं त्या निर्जीव वस्तूपेक्षा नक्कीच महत्वाचं. आता अचानक पाहुणेच येत नाहीत. आधी फोने वर दहा MESSAGE करून मगच येतात.
आम्ही लहान असताना आलेल्या माणसाने प्रश्न विचारला तर त्याचं त्याच उत्तर आम्ही मुकाट्याने द्यायचो आणि खेळायला जायचो किंवा आपल्या आईच्या मदतीला लागायचो. आता तसं नाही. मुलांना MANNERS असावे लागतात. त्यामुळे ते आलेल्या पाहुण्यांना 'हेलो अंकल' किंवा 'आंटी' असं म्हणून स्वतःच्या खोलीत जातात व त्यांच्या खोलीतला टी.व्ही. पहातात. तो चालू असतानाच हातात फोन वर गेम खेळतात.
टी व्ही आणि गेम मुळे मुलं बोलणं विसरली.
शाळेत कॅलक्यूलेटर वापरायची परवानगी मिळाल्या मुळे पाढे विसरली. (IGCSE पद्धतीत CALCULATER वापरायची मुभा आहे.)
ई मेल आल्या पासून पत्र लिहिणे विसरली, आता तर WHATS APP मुळे ई मेलही विसरली.
घरात असलेल्या कार मुळे चालणं विसरली.
विसाव्या मजल्यावरच्या घरामुळे पाऊस पडल्यावर येणारा मातीचा वासही विसरली. मैदानावर जाऊन खेळायला विसरली.
स्कुल बस मुळे मित्रांबरोबर शाळेत जाण्याचा आनंद विसरली.
रीसोर्ट मध्ये व्हेकेशन स्पेंड करताना मामाच्या गावाला जायला विसरली.
हल्ली लोकांना पाहुणे आले कि खूप ADJUST करावं लागतं म्हणे, म्हणून नातेवाईकांना विसरली.
परदेशात राहिल्या मुळे आपली भाषा विसरली, आणि आई वडिलांना ह्याबद्दल वाईट वाटणे तर सोडा आनंदच होताना दिसतो.
माणूस माणसाला विसरत चाललाय आणि यंत्रांना मित्र मानू लागलाय.
कदाचित भारतात चित्र वेगळं असू शकेलही पण मी परदेशात राहत असल्यामुळे मला हे सगळं खूप प्रकर्षाने जाणवत रहातं.
तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यात कसलीच चूक नाही. पण मला वाटतं माणूस आता तंत्रज्ञानाचा गुलाम बनत चाललाय. आधुनिक उपकरणांचा वापर केल्या शिवाय त्याला कुठलीच गोष्ट करता येईनाशी झाली आहे. मी महाविद्यालयात ३ तासाचं लेक्चर देते त्याकरता power point चा वापर करून प्रेझेन्टेशन बनवते. ह्या कुबडी शिवाय मी समर्थपणे ३ तास बोलू शकेन????
आम्ही कॉलेज मधे असताना आमचे शिक्षक फक्त खडू आणि फळा ह्याचा वापर करून शिकवत होतेच ना ? मग मला का शक्य नाही ते?
कदाचित खूप प्रयत्न केला तर जमेल सुद्धा, पण समोर बसून ऐकणार्यांना चालेल ते???? प्रश्नच आहे.
असो ....
पण कोणीतरी म्हणून ठेवला आहे बदलाची सुरुवात स्वतः पासून करायची असते म्हणून हा प्रपंच…मला नाही वाटत जे चाललंय ते योग्य आहे. पण ह्या बदलाची वाट सोपी नाही, कारण हा बदल समोरच्याला तितकासा मान्य नाही. त्यांना हे सगळं 'टु मच' वाटतं.
माझी लढाई सुरु आहे. माझी मुलं ह्या चक्रात अडकू नाहीत म्हणून मी सतत प्रयत्नात असते.
मराठीतच बोलते. मुलांना मैदानावर खेळायला लावते. परवचा म्हणून घेण्याचाही प्रयत्न केला. थोडाफार सफलही झाला.
आपली स्तोत्र, गीत रामायण, म्हणी, सण समारंभांची माहिती इत्यादी सतत त्यांना देत राहते. पण त्यामुळे त्यांना मी COOL वाटत नाही.
माझ्यासारखा विचार करणारी मंडळी तरी आता उरली आहेत का नाही कोण जाणे?
पण कुठे तरी सारखं वाटतं प्रगतीच्या मागे धावताना स्वत्वच विसरून उपयोग नाही म्हणून म्हणावसं वाटतंय शेवटचा करी विचार फिरून एकदा!!!!
असं काही ऐकलं कि मला मात्र खूप गोंधळून जायला होतं, कि हल्लीच्या मुलांचं कौतुक करावं कि ते जगत असलेल्या परिस्थितीची कीव करावी? मला तर कधी कधी वाटतं कि आईवडील मुलांना वेळ देण्याच्या कटकटीतुन सुटका करून घेण्यासाठी त्यांना हि सगळी खेळणी देत असावेत किंवा मुलाच्या मित्रा कडे आहे, म्हणजे त्याच्या कडे असलेच पाहिजे, ह्या भावनेतून देत असावेत, ह्याला पियर प्रेशर असं म्हणतात.
पूर्वी आम्ही लहान असताना आम्हाला टी. व्ही. पाहण्याचं वेड होतं. अचानक घरी कोणी पाहुणे आले कि मोठी माणसं ओरडायची आम्हाला. "तो टी. व्ही बंद करा आधी… जरा बोलुदे शांतपणे आम्हाला…" तेंव्हा राग यायचा पण आता वाटतं किती बरोबर होता त्यांचं. जिवंत माणसाशी बोलणं त्या निर्जीव वस्तूपेक्षा नक्कीच महत्वाचं. आता अचानक पाहुणेच येत नाहीत. आधी फोने वर दहा MESSAGE करून मगच येतात.
आम्ही लहान असताना आलेल्या माणसाने प्रश्न विचारला तर त्याचं त्याच उत्तर आम्ही मुकाट्याने द्यायचो आणि खेळायला जायचो किंवा आपल्या आईच्या मदतीला लागायचो. आता तसं नाही. मुलांना MANNERS असावे लागतात. त्यामुळे ते आलेल्या पाहुण्यांना 'हेलो अंकल' किंवा 'आंटी' असं म्हणून स्वतःच्या खोलीत जातात व त्यांच्या खोलीतला टी.व्ही. पहातात. तो चालू असतानाच हातात फोन वर गेम खेळतात.
टी व्ही आणि गेम मुळे मुलं बोलणं विसरली.
शाळेत कॅलक्यूलेटर वापरायची परवानगी मिळाल्या मुळे पाढे विसरली. (IGCSE पद्धतीत CALCULATER वापरायची मुभा आहे.)
ई मेल आल्या पासून पत्र लिहिणे विसरली, आता तर WHATS APP मुळे ई मेलही विसरली.
घरात असलेल्या कार मुळे चालणं विसरली.
विसाव्या मजल्यावरच्या घरामुळे पाऊस पडल्यावर येणारा मातीचा वासही विसरली. मैदानावर जाऊन खेळायला विसरली.
स्कुल बस मुळे मित्रांबरोबर शाळेत जाण्याचा आनंद विसरली.
रीसोर्ट मध्ये व्हेकेशन स्पेंड करताना मामाच्या गावाला जायला विसरली.
हल्ली लोकांना पाहुणे आले कि खूप ADJUST करावं लागतं म्हणे, म्हणून नातेवाईकांना विसरली.
परदेशात राहिल्या मुळे आपली भाषा विसरली, आणि आई वडिलांना ह्याबद्दल वाईट वाटणे तर सोडा आनंदच होताना दिसतो.
माणूस माणसाला विसरत चाललाय आणि यंत्रांना मित्र मानू लागलाय.
कदाचित भारतात चित्र वेगळं असू शकेलही पण मी परदेशात राहत असल्यामुळे मला हे सगळं खूप प्रकर्षाने जाणवत रहातं.
तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यात कसलीच चूक नाही. पण मला वाटतं माणूस आता तंत्रज्ञानाचा गुलाम बनत चाललाय. आधुनिक उपकरणांचा वापर केल्या शिवाय त्याला कुठलीच गोष्ट करता येईनाशी झाली आहे. मी महाविद्यालयात ३ तासाचं लेक्चर देते त्याकरता power point चा वापर करून प्रेझेन्टेशन बनवते. ह्या कुबडी शिवाय मी समर्थपणे ३ तास बोलू शकेन????
आम्ही कॉलेज मधे असताना आमचे शिक्षक फक्त खडू आणि फळा ह्याचा वापर करून शिकवत होतेच ना ? मग मला का शक्य नाही ते?
कदाचित खूप प्रयत्न केला तर जमेल सुद्धा, पण समोर बसून ऐकणार्यांना चालेल ते???? प्रश्नच आहे.
असो ....
पण कोणीतरी म्हणून ठेवला आहे बदलाची सुरुवात स्वतः पासून करायची असते म्हणून हा प्रपंच…मला नाही वाटत जे चाललंय ते योग्य आहे. पण ह्या बदलाची वाट सोपी नाही, कारण हा बदल समोरच्याला तितकासा मान्य नाही. त्यांना हे सगळं 'टु मच' वाटतं.
माझी लढाई सुरु आहे. माझी मुलं ह्या चक्रात अडकू नाहीत म्हणून मी सतत प्रयत्नात असते.
मराठीतच बोलते. मुलांना मैदानावर खेळायला लावते. परवचा म्हणून घेण्याचाही प्रयत्न केला. थोडाफार सफलही झाला.
आपली स्तोत्र, गीत रामायण, म्हणी, सण समारंभांची माहिती इत्यादी सतत त्यांना देत राहते. पण त्यामुळे त्यांना मी COOL वाटत नाही.
माझ्यासारखा विचार करणारी मंडळी तरी आता उरली आहेत का नाही कोण जाणे?
पण कुठे तरी सारखं वाटतं प्रगतीच्या मागे धावताना स्वत्वच विसरून उपयोग नाही म्हणून म्हणावसं वाटतंय शेवटचा करी विचार फिरून एकदा!!!!
No comments:
Post a Comment